टिप्स
- छोटे छोटे मोहरे बरेचदा मोठे काम करतात. स्वयंपाकघरात बहुपयोगी ठरणार्या या स्मार्ट टिप्सचेही असेत आहे. स्वयंपाक झटपट आणि स्वादिष्ट व्हावा, जिन्नस टिकून राहावेत, त्यांचा पुरेपुर वापर व्हावा यासाठी या टिप्स नक्कीच मार्गदर्शक ठरतील.
- आज छोले करायची इच्छा झाल्यास - छोले पाण्याने धुवावे अाणि कुकरला एक शिट्टी द्यावी. दिड तास तसेच ठेवावे . . दिड तासात छोले भिजतील . . मग नेहेमी प्रमाणे परत शिजवून छोले करावेत. ओल्या नारळाची वाटी शिल्लक राहिली तर टिकण्यासाठी थोडेसे मीठ चोळून ठेवावे.
- नारळाचे दूध काढल्यावर चव फेकून न देता त्यामध्ये कांदा आणि डाळीचे पीठ घालून भाजी करावी. अत्यंत रुचकर भाजी होते.
- कणिक चाळताना चाळणीत दोन-चार नाणी टाकली तर पीठ लवकर चाळले जाते.
- भेंडी चिरताना हाताला थोडेसे तेल लावल्यास भेंडीचा बुळबुळीतपणा हाताला न लागता काम सोपे होते.
- पुलावसाठी तांदूळ शिजवताना त्यामध्ये एखादा चमचा साखर घातल्यास शीतं मोकळी होतात.
- जायफळ टिकवण्यासाठी रांगोळीमध्ये पुरून ठेवावी. त्यामुळे कीड लागत नाही.
- मूग, मटकी, हरभरे वगैरे कडधान्याला भुंगा लागू नये यासाठी थोडीशी बोरिक पावडर लावून ठेवावी.
- आले स्वच्छ क रून फ्रिजरमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते. तसेच सहज चिरता वा किसता येते.
- अंडे उकडण्यापूर्वी पिनेने त्याच्या कवचावर अगदी लहान से छिद्र करा. उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येईल.
- आम्लेट बनविताना मिश्रणात थोडे दूध घालून फेटा म्हणजे आम्लेट सॉफ्ट आणि स्वादिष्ट बनते.
- आमरस किंवा आंब्याचे कोणतेही पदार्थ धातूच्या भांड्यात साठवून ठेवू नका. त्याचा रंग बदलण्याची शक्यता असते.
- आले, लसून, मिरचीची पेस्ट अधिक काळ टिकून राहावी यासाठी त्यात मिठासोबत एक चमचा गरम तेल घालून चांगले एकत्र करा. पेस्ट स्वादिष्ट होत
- बदामाची साले सहज निघावीत यासाठी 15 ते 20 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवा.
- बटाटे आणि कांदे एकत्र ठेवल्यास बटाटे लवकर खराब होतात.
- कांदा रडवतो.. कान्दा कापताना पानी येउ नये म्हणून शेजारी मेणबत्ती जाळावी.
- - कान्दा कापल्यावर एक वायु त्यातुन निघतो ज्या मुळे डोळ्यातून पाणी येत. आणी शेजारी जर मेणबत्ति असेल तर त्या ज्योती मुळे हा वायु जळतो आणी डोळ्यातुन पाणी येत नाही.
- पाक उरलाय... उरलेल्या पाकाचा नेहेमी सुधारस करतात. पाकात थोडा लिम्बाचा रस पिळायचा आणी बदाम, बेदाणे, काजू असा हवा तो सुका-मेवा घालायचा. पोळीला लावून खायला छान लागतो
- उरलेल्या पाकात कणिक भिजून पुऱ्या किंवा पोळ्या करता येतील .
- शेवयाची खीर करताना पाक वापरला तर त्याचा लगदा होत नाही, त्यामुळे असा उरलेला पाक त्यासाठी वापरता येईल. तसेच फ़्रुट सलाड, मिल्क शेक यासाठी पण वापराता येतो. फ़ालुदा पण करता येईल
- पुदीना उरला आहे, तो कसा टिकवता येईल.?
- पुदिना, फ़्रीजमधे रुमालात गुंडाळुन ठेवला तर हळु हळु सुकत जातो, मग त्याची पुड करुन ठेवता येते. किंवा ताजा पुदीना बारिक वाटुन त्यात थोडे पाणी मिसळुन त्याचे आईस क्युब्ज करायचे आणि ते काढुन एका प्लॅष्टिकच्या बॅगमधे भरुन ठेवायचे. हे क्युब्ज जलजीरा मधे वापरता येतात. पुदिन्याची तयार पुड बाजारात मिळते. ती खास तंत्राने वाळवलेली असल्याने, हिरवीगार असते
- पोळी करुन झाली की ती पोळपाटावर झटकून घेतली तर पिठाचे कण पोळपाटावर सांडतात. मग ही पोळी पोळ्यांच्या hot pot मिळतो त्यात ठेवायच्या. असे जर केले तर पोळ्या गरम राहतात. काचेच्या बाऊल मधे त्यांना घाम येईल बहुतेक. कोरड्या कापडात शिदोरीसारख्या पोळ्या ठेवल्या तर सर्वात छान राहतात
- कुठलेही पदार्थ तळण्या आधी तेलात एक दोन चिमुट मिठ टाकावे पदर्थ तेलकट होत नाही. हिरव्या पालेभाज्या साफ़ करुन पेपर मधे व्रॅप करुन प्लस्टिक बॅग मधे घालुन फ़्रिज मधे ठेवा, ८-१० दिवस छान रहातात.
- भरितासाठी वांगे भाजल्यावर ५-१० मिनिटे पातेल्यात झाकण लावुन ठेवावे. नंतर सरळ देठाला धरुन नळाखाली धरावे, एकदम साफ़ होते.
- पुरण पातळ झाले तर थोडा खाण्याचा सोडा टाकुन परत शिजवावे. पुरण घट्ट होते.
Thanks.Very useful 👍🏻
ReplyDeleteSugranicha salla
ReplyDeleteThanks ...indeed informative👍👍
ReplyDeleteटिप्स आवडल्या. नक्की उपयोग होईल. धन्यवाद
ReplyDeleteUseful tips .
ReplyDelete